लॉकडाउन हटवण्याची घाई केली तर, कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल

मुंबई | लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील, असं टेड्रोस एडहानोम यांनी म्हटलं आहे.

युरोपात करोनाचा मोठा फटका बसलेले देश स्पेन आणि इटली लॉकडाउनचे निर्बंध शिथील करत असून लोकांना कामावर जाण्याची परवानगी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. स्पेनमध्ये बांधकाम तसंच फॅक्टरी प्रोडक्शन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर जाण्याची परवानगी देण्याबद्दल विचार केला जात आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

-‘…तर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; तबलिगीच्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

-राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

-“एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात चालु ठेवणं योग्य नाही”

-संजय राऊतांची मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं; चंद्रकांत पाटलांकडून राऊतांचा समाचार

-“अर्थव्यवस्थेला पुन्हा रूळावर आणायचं असेल तर, आपल्याला काही धाडसी पावलं उचलावी लागतील”