नवी दिल्ली | जिथे सहजपणे आपल्या स्वातंत्र्यावर बंधनं आणली जातात जगातील अशा ठिकाणी काश्मीरी लोक त्रास सहन करत जीवन जगत आहेत. आमचा आवाज दाबणं इतकं सोपं का आहे?, असा सवाल अभिनेत्री झायरा वसीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यातील नेत्यांना नजरकैदेत ठेवत काही बंधनं घातली. यात इंटरनेटसह इतरही सेवांवर निर्बंध आणले होते. यावरून झायरा वसीमने सरकारला सवाल केला आहे.
काश्मीरमध्ये निर्बंध घातल्यामुळे पर्यटन व्यवसायाला याचा फटका बसला आहे. काश्मीरमधील परिस्थितीवरून अभिनेत्री झायरा वसीमनं सरकारवर रोष व्यक्त केला आहे. झायरानं याबाबत इस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून टाकणं इतकं सोपं का आहे? आमच्या इच्छेविरूद्ध घेण्यात आलेल्या निर्णयांवर आम्हाला आमची मतं मांडण्याचं स्वातंत्र्य का नाही, असा सवाल झायराने केला आहे.