देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन

नवी दिल्ली | देशात 24 तासांत कोरोनाचे 693 नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4067 वर पोहोचला आहे. यापैकी 1,445 रुग्ण तबलिगीशी संबंधित आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 76% पुरुष तर 24% महिला आहेत, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

कोरोनाने आतापर्यंत देशभरातील 109 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे काल देशभरात 30 जण दगावले.  देशातील 63% कोरोनाबळी 60 पेक्षा अधिक वयाचे, तर 30% मृत 40 ते 60 वर्षे वयोगटातील असून 7% मयत हे 40 पेक्षा कमी वर्ष वयाचे होते, अशी देखील माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.

भारतीय रेल्वेने 13 दिवसांमध्ये 1340 मालवाहू गाड्यांच्या माध्यमातून साखर आणि 358 टँकरच्या माध्यमातून खाद्य तेल देशाच्या विविध कान्याकोपऱ्यात पोहोचवले आहे, अशी माहिती लव अग्रलाल यांनी दिली आहे.

दरम्यान, आतापर्यंत 16.94 लाख मॅट्रिक टन अन्नधान्य देशभरात पाठवण्यात आलं आहे, असं लव अग्रलाल यांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

-“मोदींनी मला चर्चेला न बोलवणं म्हणजे हा औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान”

-14 एप्रिलनंतर ग्रामीण भागातली टाळेबंदी सरकारने उठवावी- राजू शेट्टी

-धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जिवंत काकीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं पण…

-पुणेकरांची चिंता वाढली; नाना पेठ, कोंढवा, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण