अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ! आता ‘या’ प्रकरणी अर्णव यांच्या विरोधात दुसरा गु.न्हा दाखल होणार?

मुंबई | अलिबाग पोलिसांनी बुधवारी सकाळी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना ता.ब्यात घेतलं आहे. इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आ.त्मह.त्याप्रकरणी कलम 306 च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णव गोस्वामींला अ.टक केलं आहे.

अर्णव यांच्या वरळी येथील राहत्या घरातून सचिन वाझे यांच्या पथकाने त्यांना अ.टक केलं आहे. गोस्वामी यांनी अन्वय नाईक यांना आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केलं असल्याचा आ.रोप नाईक यांच्या कुटुंबियांनी केला होता. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर गु.न्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता अर्णव गोस्वामी यांच्या विरुद्ध आणखी एक गु.न्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी अर्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची अवमानना केली होती.  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची अवमानना झाल्याप्रकरणी शिवसेनेचे विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंगाची सूचना मांडली होती.

यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी तब्बल 7 वेळा अर्णव गोस्वामी यांनी नोटीस बजावली होती. मात्र, अर्णव गोस्वामी यांनी विधानसभेच्या या सातही नोटिसांना उत्तरे दिली नव्हती. हक्कभंग सुचनेसंदर्भात गुरुवारी विधानभवनात विशेषाधिकार समितीची बैठक पार पडली. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आपली बाजू मांडली आहे.

अर्णव गोस्वामी यांना विधीमंडळाने दिलेली नोटीस ही गोपनीय स्वरूपाची होती. मात्र, तरिही अर्णव गोस्वामी यांनी ती पत्रं न्यायालयासमोर सादर केली. हा प्रकार सुद्धा हक्कभंगच आहे, असं मत प्रताप सरनाईक यांनी यावेळी बैठकीत मांडले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या मते हे विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचं हनन आहे. यामुळे आता लवकरच अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात दुसरा हक्कभंग मांडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडीओच्या इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामाचे जवळपास नाईक यांना अर्णव गोस्वामी यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही अर्णव गोस्वामी नाईक यांचे पैसे देत नव्हते. यामुळे अन्वय नाईक प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते.

यानंतर 5 मे 2018 रोजी नाईक यांनी अलिबाग जवळील काविर गावात त्यांच्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली. नाईक यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील आ.त्मह.त्या केली होती. मात्र, आ.त्मह.त्या करण्यापूर्वी नाईक यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं.

या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपल्या कामाचे पैसे न दिल्यानं आपण आ.त्मह.त्या करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सुप्रसिद्ध अभिनेत्री ते शेवटी वेश्या कोण होती ही अभिनेत्री? वाचा सविस्तर

अर्णबला अ.टक करण्यासाठी ठरला होता मोठा प्लॅन; जाणून घ्या सर्व माहिती

‘जो बायडन’ असतील अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष? पाकिस्तानला होणार ‘हा’ फायदा

उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार मारले गेल्याच्या घटनेची आठवण करून देत शिवसेनेचा भाजपवर घणाघात!

‘या’ बड्या अभिनेत्रीने स्वतःच्या वडिलांविषयीच केला धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…