मुंबई | अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या लग्नाची (Ranbir Alia Wedding) चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. अखेर आज दोघेही लग्नबंधनात अडकले.
अनेक सिनेकलाकारांच्या उपस्थितीत आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत रणबीर आणि आलियाने सात फेरे घेऊन लग्नगाठ बांधली आहे.
मैत्रीपासन सुरु झालेलं हे नातं आता सहजीवनाच्या वळणावर आलं आहे. मागील काही वर्षांपासून दोघं एकमेकांना लाईक करत असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता दोघांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात पकडलाय.
आज, आमचे कुटुंब आणि मित्रमंडळींनी वेढलेले, घरी… आमच्या आवडत्या ठिकाणी – बाल्कनीमध्ये आम्ही आमच्या नात्याची शेवटची 5 वर्षे घालवली – आम्ही लग्न केले, असं आलिया म्हणाली.
आमच्या मागे बरेच काही असताना, आम्ही एकत्र आणखी आठवणी तयार करण्यासाठी थांबू शकत नाही, असंही आलिया म्हणाली आहे.
ज्या आठवणी प्रेम, हशा, आरामदायी शांतता, चित्रपट रात्री, मूर्ख मारामारी, वाईन डिलाइट्स आणि चायनीज चावीने परिपूर्ण आहेत, अशी पोस्ट आलियाने केली आहे.
आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात सर्व प्रेम आणि प्रकाशाबद्दल धन्यवाद. यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे, असं आलियाने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज
“…आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या”, संजय राऊत RSS वर बरसले
भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…
“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”