तब्बल 6 तास अभिजीत बिचुकलेनं KISSING केली?; सलमान खानने केली बोलती बंद

मुंबई | सिनेजगतातील एक सुप्रसिद्ध शो म्हणून सलमान खानच्या बिग बाॅस या शोला ओळखण्यात येतं. दररोज या शोमधील घटना बाहेर व्हायरल होत असतात.

बिग बाॅसचा 15 वा भाग सध्या अनेक कारणांनी प्रचंड गाजत आहे. अनेक कलाकारांच्या शो मधील आणि शो बाहेरील वागणुकीमुळं हा शो सध्या चर्चेत आहे.

राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणात आपल्या अभिनय शैलीची वेगळी ओळख निर्माण करणारे मराठी कलाकार अभिजीत बिचुकले हे देखील बिग बाॅसमध्ये सामिल झाले आहेत.

बिग बाॅस शो मध्ये गेल्यानंतर बिचुकले चांगलेच चर्चेत आहेत. सहकलाकारांसोबतच्या वागणुकीमुळं बिचुकले यांना मोठ्या प्रसंगाला समोरं जावं लागलं आहे.

सध्या बिग बाॅसच्या घरात राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले आपल्या गुणवत्तेमुळं कमी आणि इतर कारणांनी जास्त प्रसिद्ध होत आहेत. सध्या या शोमधील एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

अगदी काही दिवसांमध्ये बिग बाॅसचा भाग प्रसिद्ध होणार आहे. या भागात अभिजीत बिचुकलेबद्दल खळबळ माजवणारे खुलासे करण्यात आले आहेत. या भागात अभिजीत बिचुकलेच्या वागणुकीबद्दल सांगण्यात आलं आहे.

रविवारच्या भागात एकमेकांच्या घरातील काही सिक्रेट सांगण्यात आले यामध्ये अभिजीत बिचुकलेनं एकदा 6 तास किसींग केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. परिणामी सध्या बिग बाॅसच्या घरातील  वातावरण तापलेलं आहे.

रश्मी देसाई या सहकलाकारानं तर अभिजीत बिचुकलेच्या वाईट सवयींचा पाढा वाचला आहे. अभिजीत महिलांबाबत वाईट विचार करतो, असा आरोप देसाईनं या भागात केला आहे.

रश्मी देसाईनं अभिजीत शोदरम्यान परिवाराच्या सदस्यांसमोर टाॅवेलवर फिरतो. बिचुकलेवर हे आरोप झाल्यानंतर बिचुकले आणि देसाईमध्ये जोरदार भांडण झालं. सलमान खानला या भांडणात पडावं लागलं नंतर हे  भांडण संपलं.

दरम्यान, लवकरच हा भाग प्रसिद्ध होणार असल्यानं सर्वांना आता या भागात आणखीन काय काय पहायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. बिचुकले कुठेही जातात तिथं राडा तर ठरलेलाच असतो हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या – 

“दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांनी बाजूला फेकलं” 

शॅाकिंग… राजीनामा विराट कोहलीचा; हादरा बसला रोहित शर्माला! 

शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण, या कारणामुळे खटला दाखल 

‘धोका अजून टळलेला नाही, Omicron नंतर…’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा 

“विराट मान उंच ठेव… तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलंय”