गुहागर | राष्ट्रवादीची आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. ही यात्रा कोकणात पोहचली आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुहागरमध्ये सध्याच्या भाजप शिवसेनेच्या युतीवरच्या चर्चेच्या गुऱ्हाळावर जोरदार टीका केली आहे.
युतीच्या पोपटाची अवस्था फार वाईट आहे. वाघसुद्धा दरवाजातून 144 जागांची मागणी करतोय, तर भाजप सांगतोय आम्ही फेकलाय तेवढा तुकडा घ्या, अशा शब्दात कोल्हेंनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.
स्वार्थासाठी सत्तेच्या वळचणीला जाणाऱ्यांचा इतिहास नसतो, तर लढणाऱ्यांचा असतो, अशा शब्दात कोल्हेंनी गयारामांवर निशाणा साधला.
छत्रपती शिवाजींचा भगवा आता राष्ट्रवादीच्या हातात आला आहे. कुणाच्या जाण्याने पोकळी निर्माण होणार नाही. कारण झाडाला सुद्धा पालवी फुटते, अशा भावना कोल्हेंनी यावेळी व्यक्त केल्या.
शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर गेल्या पाच वर्षांत शिवसेना-भाजप युतीचं सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका यावेळी बोलताना अमोल कोल्हेंनी केली.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभा निवडणुकांचा बिगूल आज वाजणारhttps://t.co/HSmJfRcDZT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
“भाजप नेत्यांनी तोंडास कुलपं घातली तर…” https://t.co/YRtXNjNpjq @Shivsena @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
मुख्यमंत्री काहीही बोलू शकतात कारण त्यांच्यावर नागपुरचे संस्कार आहेत; पवारांची बोचरी टीका https://t.co/xWv0R6rGfH @PawarSpeaks @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019