‘आम्ही 162’ म्हणणाऱ्यांनी त्या सभागृहात 145 तरी उपस्थित होते का ते सांगावं?- आशिष शेलार

मुंबई | ‘आम्ही 162’ म्हणणाऱ्यांनी त्या सभागृहात 145 आमदार तरी होते का? , असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला आहे. आघाडीच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजपकडून शेलारांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली.

महाआघाडीचा पोरखेळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. ओळखपरेडमुळे विधानसभेचं संख्याबळ सिद्ध होत नाही, गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा हा त्यांचा टुकार प्रयत्न, असं जोरदार टीकास्त्र त्यांनी आघाडीवर सोडलं.

हॉटेल ग्रँड हयातमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र आले होते. यावेळी तिन्ही पक्षांच्या आमदारांना संविधानाची शपथ देण्यात आली. या शपथेवेळी पक्षाने घेतलेल्या निर्णय आम्हाला मान्य असेल आणि तसंच आम्ही वागू असं वदवून घेण्यात आलं. यावरच आशिष शेलारांनी टीकास्त्र सोडलं.

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाची शपथ घेतली. शिवसेनेचं हिंदुत्व किती बेगडं आहे, यावरून दिसून येतं. काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच बहुमत सिद्ध करतील, असंही ते म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-