मुंबई | भाजपचे डझनभर आमदार फुटणार अशी माहिती समोर आली होती. ती निव्वळ अफवा आहे, असं सांगत राज्याचे माजी शालेय शिक्षणंत्री आशिष शेलार यांनी भाजपचे आमदार फुटणार असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
तिघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ती लपवण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा शब्दात शेलारांनी महा विकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
तिघाडीच्या नेत्यांकडून चोराच्या उलट्या बोंबा मारणं सुरु आहे. भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून आलेले नेते किंवा मूळ भाजपमधले नेते असो सर्वजण शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे, असंही शेलार म्हणाले आहेत.
दरम्यान, आपल्यासह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांना आश्वासनं देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन ८ दिवस होत आले तरीही आणखी खातेवाटप करु शकले नाही, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“स्वत:चा आत्मसन्मान जपा अन् अन्याय होतोय तर बाहेर पडा” – https://t.co/5hCBYgcnjQ @BJP4Maharashtra @AnilGoteOffice @Pankajamunde @EknathKhadseBJP
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
जेलमधून बाहेर येताच पी. चिदंबरम यांचा सरकारवर बरसले! – https://t.co/bhrvZFWgBE @PChidambaram_IN @INCIndia @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
“आरोपींना वेळीच अटक केली असती तर ही घटना घडली नसती” – https://t.co/VhBBCBrDmb @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019