मुंबई | शपथविधी भल्या पहाटे का केला, असा सवाल राऊत यांनी केला आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की आम्ही सकाळी 6 वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. हा रामप्रहर आहे. शपथविधी रामप्रहारी झाला. पण जे रामालाच विसरलेत त्यांना काय कळणार?, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
चोरून केलेलं काम कोणतं. हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. काळ्या गाडीतून जे नेते रात्री काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना भेटायला जातात. त्यांनी कोणतं काम चांगलं काम केलं?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
बहुमत होतं तर चोरुन शपथविधी का केला?, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यालाच आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, काँग्रेसशी संधान साधलं तर तो त्यांचा गोराबाजार आणि आम्ही बारामतीच्या पवारांशी सलगी केली ती म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही केलेला काळाबाजार? हे कसे काय असू शकतं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आजच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्या; महाआघाडीचे वकील कपील सिब्बल यांची मागणी https://t.co/tdKoa2IZL2 #MaharashtraPoliticalCrisis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 24, 2019
महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर; निर्णायाकडे सगळ्यांचं लक्ष https://t.co/OdgQceHFmu #MaharashtraPoliticalCrisis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 24, 2019
घाणेरड्या भाषेत बोलायला मी संजय राऊत नाही; आशिष शेलारांचा टोला https://t.co/zuwZAeoZgQ @ShelarAshish @rautsanjay61
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 24, 2019