जे रामालाच विसरलेत त्यांना ‘रामप्रहर’ काय कळणार?- आशिष शेलार

मुंबई | शपथविधी भल्या पहाटे का केला, असा सवाल राऊत यांनी केला आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की आम्ही सकाळी 6 वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. हा रामप्रहर आहे. शपथविधी रामप्रहारी झाला. पण जे रामालाच विसरलेत त्यांना काय कळणार?, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

चोरून केलेलं काम कोणतं. हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. काळ्या गाडीतून जे नेते रात्री काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना भेटायला जातात. त्यांनी कोणतं काम चांगलं काम केलं?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

बहुमत होतं तर चोरुन शपथविधी का केला?, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यालाच आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, काँग्रेसशी संधान साधलं तर तो त्यांचा गोराबाजार आणि आम्ही बारामतीच्या पवारांशी सलगी केली ती म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही केलेला काळाबाजार? हे कसे काय असू शकतं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-