“ही वेळ राजकारणाची नाही, निवडणुका लागल्यावर राजकारण करता येईल”

मुंबई | कोरोनासंदर्भात काम करताना मंत्रिमंडळांमधील नेत्यांमध्ये विसंवाद असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे.

राज्यावर संकट असताना ही ब्लेमगेमची वेळ नाही. नंतर निवडणुका लागल्यावर हे राजकारण करता येईल, आम्हीही उत्तरं देऊ, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलंय.

देशानं पाकिस्तानशी युद्ध केलं तेव्हा पूर्ण देश एकत्र होता. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला, तेव्हा देश एकत्र होता. हा सुद्धा एक लढा आहे आणि एकत्रितपणे लढला पाहिजे, असं मला वाटतं. आम्हालाही काही गोष्टी दिसताहेत. कोण काम करत. कोण फक्त फोटो काढून व्हायरलं करतंय. पण, आम्ही काही बोलत नाही, कारण ही वेळ नाही, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

आपला दुश्मन कोरोना आहे. त्याच्याशी एकत्रितपणे लढणं गरजेचं आहे. त्यासाठी सकारात्मक सूचनांचं स्वागत आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना विनंती करतो, महाराष्ट्रात लष्कराच पाचारण करा”

-आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही- राहुल गांधी

-लॉकडाउन हे भारताने वापरलेलं सर्वात प्रभावी अस्त्र- डॉ. रमण गंगाखेडकर

-“सरपंच आणि पोलीस पाटलांना 25 लाखांचं विमा संरक्षण द्या”

-मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द