निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला चंद्रकांत पाटील म्हणाले, 220 नक्की मिळणार!

मुंबई : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला युतीच्या 220 जागा नक्की मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वांचं  लक्ष लागून राहिलं ते सेना-भाजपच्या युतीकडे. 

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप पुन्हा सत्ते येणार, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे. 

पोटनिवडणूक लागणं किंवा न लागणं हा निवडणूक आयोगाचा विषय आहे. तेच यावर समर्पक उत्तर देतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना चंद्रकांत पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

सातारची पोटनिवडणूक लागली नाही मग उदयनराजेंची काय भूमिका असेल ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

जरी पोटनिवडणूक लागली नसली तरी उदयनराजे हे भाजपचे आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते पुर्णपणे प्रयत्न करतील असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-