भोपाळ | भाजप खासदार असल्यानं आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून मी महत्त्वाचे विषय उपस्थित करायचे, असं लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.
राज्यात भाजपचं सरकार असताना महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी मी काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे, असंही सुमित्रा महाजन यांनी सांगितंल आहे. राज्यपाल लालजी टंडन यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी भाजपचं सरकार होतं. आपल्याच पक्षाचं सरकार असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. मात्र इंदूरमधील जनहिताचे प्रश्न उपस्थित करायला हवेत असं मला कायम वाटायचं, असं म्हणत सुमित्रा महाजन यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
दरम्यान, मी अनेकदा काँग्रेस नेत्यांची मदत घ्यायचे. त्यांच्या माध्यमातून अनेकदा जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे उचलायचे, असं सुमित्रा महाजन म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“2024 पर्यंत सर्व घुसखोरांना देशाच्या बाहेर काढणार” – https://t.co/JOwnAYo8Ur @AmitShah @BJP4Maharashtra #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
‘चांद्रयान 2’ मोहिमेतील विक्रम लँडरचा पत्ता लागला! – https://t.co/HpWGwFtfQk #Chandrayaan2 @NASA #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
भाजपचा गढ असलेल्या पूर्व विदर्भात शिवसेनेला वर्चस्वाची संधी – https://t.co/yYwY2YQoRS @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019