मुंबई | गेल्या काही दिवसांपासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा लढणार असल्याच्या चर्चा आहेत. खुद्द आदित्य ठाकरे यांनी देखील तसे संकेत दिले आहेत. यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आदित्य यांच्याविरोधात काँग्रेस मजबूत उमेदवार देणार असल्याचं म्हटलं होतं.
महाराष्ट्र विधानसभेसाठीची काँग्रेसची पहिली यादी 20 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत 50 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या छानणी समितीच्या बैठकीत 100 जणांची नावे निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी 50 जणांची उमेदवारी उद्या 20 तारखेला जाहीर करण्यात येणार आहे.
पुढील नावे ठरवण्यासाठी येत्या 2 ते 3 दिवसांत छानणी समितीची बैठक पार पडणार असल्याची माहिती देखील थोरात यांनी यावेळी दिली.
आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सुरक्षित असल्याचं मानलं जातंय. याच मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, मुंबईमधून जर आदित्य ठाकरे जर लढले तर काँग्रेसपुढे त्यांना पराभूत करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदी निघालेत न्यूयॉर्कला पण खोडा घातलाय पाकिस्तानने!https://t.co/mnwnFu1qSy @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
शिवरायांच्या समाधीस्थळी राजकीय घोषणाबाजी केल्याप्रकरणी या शिवसेना आमदाराचा माफीनामा! https://t.co/iWmGS6GMZp @BharatGogawale @Shivsena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
शेतकरी पिशवीत कांदा आणतील म्हणून मोदींच्या सभेत पिशव्यांनाच बंदी!https://t.co/debvdAh7Lr @narendramodi @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019