नागपूर | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची सगळी तयारी झाली आहे. लोकांचं ठरलंय… पुन्हा भाजपलाच संधी द्यायची… त्यामुळे ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर जरी निवडणूक घेतली तरी भाजपच जिंकणार आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
उपराजधानी नागपूरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला.
आम्हाला जर गडगडच करायची असती तर आम्ही बारामतीत केली असती आणि ती ही जागा जिंकली असती, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.
बॅलेट पेपरवर जरी निवडणूक घेतली तरीदेखील भाजपला कसलाच फरक पडणार नाही. आम्ही 220 जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
छगन भुजबळांच्या हाती पुन्हा भगवा? उद्धव ठाकरे म्हणतात…- https://t.co/yjkPbSubdE #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 25, 2019
सारा अली खानमुळे एका दाम्पत्याला सापडला त्यांचा हरवलेला मुलगा!- https://t.co/UHychIjW03 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 25, 2019
मला माझं स्वातंत्र्य परत द्या; IAS अधिकाऱ्याच्या राजीनाम्याने देशात खळबळ- https://t.co/m9lyKti1TP #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 25, 2019