मुंबई | महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम केंद्रिय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे. यानंतर विधानसभा निवडणुकीत मतदार पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीला कौल देतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मी गेली 5 वर्षे सकारात्मक दृष्टी ठेऊन काम करत आलो आहे. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मला विश्वास आहे की राज्यातील जनता पुन्हा एकदा भाजप शिवसेनेला आशीर्वाद देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेनेसोबत आमची बोलणी सुरू आहे. आम्ही विधानसभा निवडणूक युती करूनच लढवणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
आमच्या सरकारविरोधात कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नाही. विरोधकांनी फक्त आरोप केले पण पुरावे देऊ शकले नाहीत, असं ते म्हणाले.
दरम्यान, लोकशाहीच्या या महाउत्सवात जनतेने हिरीरीने सहभागी व्हावे आणि लोकशाही बळकट करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेने केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
जहिरात बघून साबण आणि तेलाची निवड करा… नेत्याची नाही; अमोल कोल्हेंचं टीकास्त्र https://t.co/W5CQKNL1YI @kolhe_amol
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
काँग्रेसच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांची दोन्ही मुले काँग्रेसच्या पहिल्या यादीत? – https://t.co/zEhJSO6dfH @INCMaharashtra @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
वाघाची कुत्र्यासारखी अवस्था झालीये; धनंजय मुंडेंची शिवसेनेवर घणाघाती टीका https://t.co/MwpzrJEL0L @dhananjay_munde @Shivsena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019