बाळासाहेब थोरातांच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर!

लातूर : काँग्रेस राष्ट्रवादीची हवा संपली आहे… हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही, अशी खरपूस टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते लातूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

आमची लढाई आता काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नाहीच. आता आमची लढाई वंचित बहुजन आघाडीशी आहे. काँग्रेस राष्ट्रवादी ‘बी टीम’ आहे तर वंचित आता ‘ए टीम’ आहे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

सर्वसामान्य माणसाला कळून चुकलंय. ते तुमच्या पाठिशी आता उभे रहायला तयार नाही. आम्हाला ते परत एकदा आशीर्वाद देऊन बहुमताने सत्तेवर आणणार आहेत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी आरशात पाहावं असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. आम्ही आरशात नाही तर लोकांच्या चेहऱ्यावर पाहतो. लोकांच्या चेहऱ्यामध्ये काय दडलंय ते आम्हाला दिसतंय. म्हणून आरशात बघायची वेेळ कोणावर आली आहे हे सांगायची गरज नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी थोरातांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला ‘मेगागळती’ लागली आहे. मात्र आमच्याकडे ‘मेगाभरती’ नाही. आम्ही निवडक लोकांनाच प्रवेश देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-