मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याने युतीबाबतचा संभ्रम कायम

मुंबई | विधानसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र युती होणार की नाही याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे युती होणार की नाही याबाबत बऱ्याच चर्चा घडत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी युतीबाबत विचारलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सस्पेन्स कायम ठेवला आहे.

युतीबाबतची तुम्हाला जेवढी चिंता आहे तितकीच आम्हालादेखील आहे. मात्र योग्यवेळी निर्णय जाहीर करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे जरी स्वत:च पक्षप्रवेशाच्या तारखा जाहीर करत असले तरी त्यांच्या पक्ष प्रवेशाविषयी योग्यवेळी निर्णय जाहीर करू, असंही ते म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी निर्णयाने उद्योजकांना दिला मिळाला असल्याचं त्यानी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या