राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत येणार; नाना पटोलेंचं भाकीत

यवतमाळ : राज्यात काँग्रेस पक्ष आघाडीचे सरकार म्हणून सत्तेत येणार आहे. शिवसेना विरोधी पक्ष राहणार असून भाजपचा पत्तादेखील सापडणार नाही, असं भाकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी वर्तवलं आहे. यवतमाळमधे काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘महापर्दाफाश सभे’त ते बोलत होते.

नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या या भाजप-शिवसेना सरकारला येत्या विधानसभा  निवडणुकीच्या निमित्ताने मातीत गाडा, असं आवाहन करत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांना बढती देण्यासाठी राज्य सरकारच्या अनेक विभागांची सरकारी खाती अ‌ॅक्सिस बँकेत वळविली आहेत. परिणामी अमृता फडणवीस या अ‌ॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

भाजपने देशप्रेमाच्या नावावर मतं मिळवत देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्यातील मंत्री दुष्काळ आणि पूर्वस्थितीत जोकरगिरी करून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करीत आहेत. पवित्र पोर्टल, सरळ सेवा भरती आणि ऑनलाईन नोंदणीत पैसा लाटून बेकारीत वाढ करण्याचे पाप सरकारने केल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-