भाजपच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप, अशोक चव्हाण म्हणतात…

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत होती. अखेर आज या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून लवकरंच मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी  11 उमेदवार रणांगणात उतरल्याने चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. त्यात भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या आमदारांसोबत दोन सहकारी उपस्थित होते व त्यांनी मतदानपेटीत मत टाकल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

काँग्रेसने या दोन मतांवर आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे याविरोधात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 वाजता मतमोजणी सुरू होणार होती. मात्र, काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणीला उशीर होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतरच मतमोजणीला सुरूवात होईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“महाविकास आघाडी सरकारच्या अहंकाराचा या निवडणुकीत पराभव होणार”

’56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ

“आज कुणीही पावसात भिजलं तरी काहीही उपयोग नाही, मविआ निवडणूक हरणारच”

“राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर…”

अग्निवीरांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजप देणार नोकरी, ‘या’ नेत्याची मोठी घोषणा