शरद पवारांचं राजकारण संपलं… आता आमचं राजकारण सुरू झालंय- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  शरद पवारांनी जे राजकारण इथून पाठीमागच्या काळामध्ये केलं तेच राजकारण त्यांच्या अंगलट येत आहे. आता त्यांचं राजकारण संपलं. नवीन पिढीचं राजकारण वेगळं आहे. मी पवार नाही मी देवेंद्र फडणवीस आहे. आता त्यांचं राजकारण संपलं आहे आता आमचं राजकारण सुरू झालं आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आमच्या सरकारवर 5 वर्षात कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही. विरोधकांनी आमच्यावर फक्त आरोप केले मात्र पुरावे देऊ शकले नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी आम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले मात्र पुराव्याशिवाय आम्ही कुठलेही आरोप केले नाहीत. मात्र आता विरोधक पुरावे देऊ शकत नाहीत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

पुराव्याशिवाय जर विरोधक आरोप करत असतील तर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

महत्वाच्या बातम्या-