सातारा | पुण्यातले कार्यक्रम आवरून भाजपची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात पोहचली. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला धक्का देऊन नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. फक्त आदेश द्यायचे असतात, असं मुख्यमंत्री फडणवीस सातारच्या सभेत म्हणाले.
महाजनादेश यात्रेनिमित्त झालेल्या सभेत बोलताना उदयनराजेंनी साताऱ्यात मेडिकल कॉलेज व्हावे. साताऱ्यातील रस्त्यांची कामे व्हावीत, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात महाराजांनी फक्त आदेश द्यावेत. त्यांच्या सगळ्या मागण्या हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपतींच्या घराण्याने तुम्हाला खूप काही दिलं. पण तुम्ही त्यांना काय दिलं असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला विचारला.
छत्रपतींचं घराणं हे घेणारं नाही तर देणारं घराणं आहे. उदयनराजे तुम्ही फक्त आता आदेश द्या. तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंना आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या, असं आवाहान त्यांनी सातारकरांना केलं.
महत्वाच्या बातम्या-
ते छत्रपती आहेत मी मावळा आहे… असं म्हणणारे अमोल कोल्हे आज म्हणतात ‘देशात राजे कोणीच नाही!’ https://t.co/Rj7pOmExRZ @kolhe_amol @Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
शिकार करून जगणारी अवलाद आहे… तुकड्यावर जगणारी नाही; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादीवर घणाघात https://t.co/JHkvIhbH0x @BJP4Maharashtra @NCPspeaks @kolhe_amol
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
“या अशा लोकांबरोबर 15 वर्ष राहिलो की… आणखी किती वर्ष काढायची??” https://t.co/c4kksuzQxH @Chh_Udayanraje @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019