भाजप ही हारलेली नाही तर जिंकलेली टीम आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | भाजप ही हारलेली नाही तर जिंकलेली टीम आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असं प्रतिपादन विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते मुंबईत भाजपच्या महाअधिवेषणात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरजार टीकास्त्र सोडलं आहे. काही लोक सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मात्र, अशा लोकांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं ते म्हणाले आहेत. केवळ सत्ता हा आमचा उद्देश नाही तर समाजात आर्थिक, सामाजिक बदल करणे हे आमचे उद्धीष्ट आहे, असंही ते म्हणाले आहेत.

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेशिवाय त्यांची अवस्था पाण्याविना माशासारखी होते. त्यामुळेच ते अभद्र आघाडी करुन सत्तेत येत असताना, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

भाजपला देशात मोठ्या नेत्यांची पंरपरा आहे. तसेच भाजपला कोणतेही पद वारसात मिळत नाही. इथे पद कमवावं लागतं. जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे, असंही फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“इंदुरीकर बोलले त्यात चुकीचं काय?; कारवाई केली तर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू”

-“आपण कुठल्याही पक्षाचे असा…आता आपण सारे जण दिल्लीचे 2 कोटी लोक माझे कुटुंबीय आहात”

-कै.आर.आर.(आबा) पाटलांच्या नावाने सरकार देणार ‘हा’ पुरस्कार!

-“उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर केला”

-चांगलं काम करुनही एवढा त्रास सहन करावा लागतोय; इंदुरीकरांची पुन्हा उद्वीग्न प्रतिक्रिया