मुंबई | काल(शनिवार) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मतदारांना महत्वपूर्ण आवाहन केलं आहे.
लोकशाहीतील सर्वात मोठ्या महोत्सवाचं मी स्वागत करतो. सगळ्या महाराष्ट्रीयन बंधू आणि भगिनींनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. प्रत्येक मत महत्वाचं आहे. अमूल्य आहे. त्यामुळे आपल्या मताचं महत्व जाणा. मतदान करा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
निवडणूक आपल्याला आपलं हक्काचं सरकार निवडण्याची संधी देते. आपलं मत ही विकास प्रक्रियेतील फार मोठी शक्ती आहे. त्याचा उपयोग करून आपण आपलं सरकार निवडा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
सरकारवर टीका करण्याचा अधिकार सगळण्यांनाच आहे. मात्र नैतिक अधिकार त्यांनाच आहे जे मतदान करतात, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षातून मतदान करण्याची संधी सर्वसाधारण माणसांना म्हणजेच मतदारांना मिळते. ज्यातून आपण आपले राज्यकर्ते निवडू शकतो. त्यामुळे मतदान प्रक्रियेत सहभाग घेणं महत्वाचं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट-
लोकशाहीतील सर्वात मोठ्या महोत्सवाचे मी स्वागत करतो.
प्रत्येक महाराष्ट्रीयन बंधू आणि भगिनींनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रत्येक मत महत्वाचे आहे आणि ते अमूल्य आहे.
आपले मत ही विकास प्रक्रियेतील फार मोठी शक्ती आहे.#MaharashtraElection2019#AssemblyElections pic.twitter.com/ZIsEvpN7Zf— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 21, 2019
महत्वाच्या बातम्या-
प्रणिती शिंदेंविरुद्ध आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार!- https://t.co/5kkRsBp2Tv #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
मतदान करणाऱ्यांना सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार- देवेंद्र फडणवीस- https://t.co/L2HfoVl6ke @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
…म्हणून शिवसेनेच्या वाघाची शेळी-मेंढी झालीय- नारायण राणे- https://t.co/bdwOrtciKT #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019