…नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल- देवेंद्र फडणवीस

मुंबई | ठाकरे सरकारकडून फडणवीसांनी आणलेल्या अनेक योजनांना ब्रेक लावण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आमच्या विकासाच्या रेषेपेक्षा मोठी रेषा मारा. आमची रेषा मिटवू नका. नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीतील अंजुर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले. आमच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असं ते म्हणाले आहेत.

आम्ही केलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ शकत नाही. कामाचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर जनता सुज्ञ आहे. ते ज्याचे त्याचे माप त्याच्या पदरात टाकते, असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. आपण केंद्राच्या मदतीने विकास साधू, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार

-सावधान… आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध; काढता येणार फक्त 50 हजार रूपये!

-13 लाख 85 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 9 हजार कोटी रूपये; अजित पवारांची माहिती

-औरंगाबादच्या विमानतळाचं नामांतर म्हणजे पराक्रमी महाराजांना दिलेली मानवंदना- जयंत पाटील

-शौचालयाला शिवाजी महाराजांचं नाव नाही; संदीप देशपांडेंचा आरोप प्रसाद लाड यांनी खोडला