विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे ‘हे’ सात उमेदवार निश्चित!

मुंबई :  भाजप-शिवसेनेनं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत  विरोधकांना पुन्हा धक्का देण्यासाठी अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचलं आहे. पण आता युतीकडून सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे सात उमेदवार निश्चित झाल्याचं समजतयं.

राष्ट्रवादीे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसंच उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाली आहे.

कोणत्या मतदारसंघात आपल शक्तीस्थानं काय आहे आणि काय नकारात्मक बाजू आहे, याबाबतचही खलबतं झाली आहे. तसंच विधानसभेतील उमेदवारीसाठी पक्षातील काही दिग्गज नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून पुन्हा एकदा विधानसभेच्या आराखड्यात उतरणार आहेत.  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतय.

दरम्यान, सेवाग्राम किंवा धुळ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस 138, राष्ट्रवादी 138, आणि 12 जागा मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं समजतय. मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आपल्या खात्यातील जागा सोडण्यास तयार आहे.  

महत्वाच्या बातम्या –