मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत आघाडीची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना अचानक मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.
याच मुद्द्यावरून सध्या खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच आता राजकीय वातावरण देखील पेटल्याचं पहायला मिळतंय.
भाजपाविरोधात बोलल्यानेच किरण मानेंची गंच्छंती करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस नेते करताना दिसत आहेत. अशातच आता किरण माने यांच्या सहकार्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मुलगी झाली हो’ या मालिकेत साजिरीची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगांवकरने किरण मानेंच्या वर्तवणुकीवरून टार्गेट केलं आहे. सुरूवातीला काही महिने संपल्यानंतर हा सर्व प्रकार सुरू झाला, असं दिव्या म्हणाल्या.
मी या शोमध्ये प्रमुख कलाकार असल्याने किरण माने यांना खटकत होतं. किरण माने सतच टोमणे मारायचे. माझ्या वडिलांविरोधात बोलले. माझ्याविरोधात अपशब्द बोलायचे, असे आरोप दिव्या पुगांवकरने केला आहे.
कोणता बाप आपल्या मुलीला अपशब्द उच्चारतो? मला सतत मनस्ताप आणि मानसिक दबावात बोललं जात होतं, असंही दिव्या पुगांवकर म्हणाली.
इतर कलाकारांशी जी वागणूक होती ती चुकीची होती म्हणून त्यांना तीन वेळा ताकिद देखील देण्यात आली होती, असा खुलासा देखील तिने केला आहे.
ही मालिका सुरुच राहणार आहे. गैरवर्तवणुकीमुळे त्यांना मालिकेकडून काढण्यात आल्याचं देखील तिने यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, दिव्या पुगांवकरच्या आरोपानंतर आता सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता येत्या काळात चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तालिबान्यांचा यु-टर्न! लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद
शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…