मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले असताना धक्काबुक्की झालेले शेतकरी महेंद्र देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांना फक्त भाजप न्याय देऊ शकतो, अशा भावना महेंद्र देशमुख यांनी व्यक्त केल्याचं कळतंय.
महेंद्र देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीबाहेर आले असताना त्यांच्यावर अन्याय झाला होता. हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. कृषीमंत्री दादा भुसे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
कृषीमंत्री, तहसीलदार, बँक अधिकारी यांच्याशी खूप दिवस चर्चा करूनही ही विषय मार्गी न लागल्याने महेंद्र देशमुख यांनी त्यांच्या लहान मुलीसह फडणवीसांची भेट घेतली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेच मला न्याय देऊ शकतील. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी फक्त भाजपच न्याय देऊ, असं देशमुख यांनी म्हटल्याचं भाजप आमदार राम कदम यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“फक्त झेंड्याचा रंग बदलून चालणार नाही तर मनसैनिकांनी त्यांची मनं देखील बदलली पाहिजेत”
-“राहुल गांधीनी आधी स्वत:च्या आजीचा इतिहास सांगावा आणि मग सावरकरांवर बोलावं”
-मुंबई महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा; फडणवीसांनी नगरसेवकांना दिले आदेश
-“चव्हाणांच्या दाव्याने खळखळ किंवा खळबळ होण्याचं कारण नाही”
-मंत्रालयानंतर सर्व शाळांमध्येही मराठी सक्ती, नवा कायदा तयार करण्याचे काम सुरु