राज्यसभेत पाठवून राष्ट्रवादी करणार ‘या’ बड्या नेत्याचं राजकीय पुनर्वसन

मुंबई : एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीत चुरस पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिलला रिक्त होणार आहेत. यात महाविकासआघाडीला 4 जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आल्याने महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे. त्यामुळे पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जात आहे.

फौजिया खान या माजी मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेची निवडणूक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-बच्चू कडूंनी लुटला सर्वसामान्य जनतेसोबत लोकल प्रवासाचा आनंद

-विरोधक सीएएचं राजकारण करून दंगली घडवून आणतायत- अमित शहा

-अखेर केजरीवालांची मंजुरी; कन्हैया कुमारविरुद्ध देशद्रोहाचा चालणार खटला

-मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं तर…- देवेंद्र फडणवीस

-मुस्लीम आरक्षणासंदर्भात बोलताना बोळासाहेब थोरात म्हणतात…