मुंबई | ग्रामीण भागातील अस्सल कहाणी सांगणारी मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला ही होती. या मालिकेतील राणा दा आणि अंजली बाई तर सर्वांच्याच आवडीचे.
अंजली बाई म्हणजेच अक्षया देवधर आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी यांच्यात तुझ्यात जीव रंगला मालिकेपासून खऱ्या आयुष्यात देखील जीव रंगला होता.
अनेक दिवसांच्या चर्चा आणि प्रतिक्षेनंतर अखेर राणा दा आणि अंजली बाईंनी साखरपुडा उरकून घेतला आहे. सध्या या दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
पहिल्यांदा हे फोटो पाहून कोणाला खरं वाटलं नाही कारण अनेक दिवसांच्या चर्चा होत्या. पण या दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून फोटो शेअर केल्यानंतर माहिती पक्की झाली.
अंजली बाईंनी म्हणजेच अक्षयानं फोटो शेअर करताना गाॅट एंगेज्ड, हुश्श्श असं कॅप्शन दिलं आहे. याचाच अर्थ की एकदाचं झालं असा चाहते घेत आहेत.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही जोडी मराठी सिनेक्षेत्रातील एक नामांकित जोडी आहे. लहान पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध मालिका असलेल्या तुझ्यात जीव रंगलामध्ये दोघांची केमेस्ट्री चांगलीच जुळली होती.
गावा-गावात तुझ्यात जीव रंगला मधील राणा दा सारखा पैलवान होण्याची आणि अंजली बाईंसारखी शिक्षीका होण्याची अनेकांनी स्वप्न पाहीली हे मात्र नक्की.
पाहा पोस्ट –
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
वाद भोंग्यांचा! मुंबई पोलिसांनी दिली ‘इतक्या’ भोंग्यांना परवानगी
“मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर देशद्रोहाचं कलम लावलं नाही”
…अन् प्रसिद्ध अभिनेत्याला न्यूजरूममधून अँकरने काढलं बाहेर; पाहा व्हिडीओ
“बाहेरून गुंड आणून मुंबईत गोंधळ करण्याचा डाव”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
“अहो आदित्यजी अशा घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे इतिहास….”