‘जर माझं चुकलं असेल तर….’; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बंडातात्यांनी मागितली माफी

पुणे | राज्यात वाईन विक्रीच्या निर्णयावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करताना दिसत आहे. अशातच वारकरी संप्रदायातील एक चर्चित व्यक्तीमत्त्व बंडातात्या कराडकर यांनी वादात उडी घेतली आहे.

बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महिला आयोगनं केली.

कराडकर यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वादंग निर्माण झाला. अशातच आता बंडातात्या कराडकर यांनी थोडं नमतं घेतल्याचं पहायला मिळत आहे.

पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना बंडातात्या कराडकर यांनी सर्वच राजकीय नेत्यांची मुलं दारु पित असल्याचं सांगत पुरावे असल्याचाही दावा केला. त्यांच्या वक्तव्यामुळे महिला आयोग आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

वातावरण पेटत चालल्याचं पाहून आता बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याने भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं बंडातात्या यांनी म्हटलं आहे.

ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कमीपणा कसला? पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल केलं. पत्रकारांनी आता विषय वाढवू नये, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातील महिला नेत्यांनी टीका करायला सुरूवात केली आहे. अनेक स्तरातून त्यांच्यांवर टीका करण्यात आल्या.

बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणींत वाढ निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यात तब्बल 1687 शिक्षकांना कोरोनाची लागण 

  दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय घट; वाचा आकडेवारी

टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा

 शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

 धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू