“तुम्ही ठरवलं तर माझा पहिला नंबर येतोच, 3 मार्कशीट जूळवून पहिले आले, आता…”

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी 2019 साली मोठी उलथापालथ घडली होती. शिवसेनेना भाजपला डावलून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.

त्यावरून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं होतं. त्यावरून आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला डिवचत टीका केली आहे.

मी ठरवलं तर माझा नंबर 1 येतोच. तुम्ही 2014 ला आणला होता आणि 2019 सुद्धा आणला होता. पण काही लोकांनी दोन मार्कशीट जुळवून आपला नंबर पहिला केला, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

पण तुम्ही काळजी करू नका. मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला त्याला कुणीच थांबवू शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

माझा गाडा सुद्धा या ठिकाणी धावला. नुसता धावला नाहीतर पहिल्या देखील आला, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

बैल हा धावणारा प्राणी आहे, धावणं त्याला आवडतं आणि धावणं हा त्याचा गुण आहे. त्यानंतर तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो अहवाल स्वीकारला, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

घटक पक्ष एआयएमआयएमसोबत युती करायचा विचार करत आहेत. तेच विचार करतात आणि आरोप ही करणार तेच. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळत आहेत, अशी खरमरीत टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नवनीत राणांवर चढला पुष्पाचा फिवर! म्हणाल्या, “नवनीत नाम सुनके…”; पाहा व्हिडीओ

“…मग मोहन भागवत यांच्या नावापुढे ‘खान’ लावणार का?”

“देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”

एमआयएमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल”