गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी; कोरोना लस घेण्याबाबत तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases in Maharashtra) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या मंगळवारीही 40 हजाराच्या जवळ पोहोचली आहे. अशात तज्ज्ञांनी गर्भवती महिलांना महत्वाचा सल्ला दिल्ला आहे.

गर्भवती महिला आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या महिला कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यापासून कुचराई करत आहेत. आतापर्यंत फक्त 20 टक्के गर्भवती महिलांनी (Pregnant Women) कोरोनाची लस घेतली आहे.

तज्ज्ञांच्या मते गर्भवती महिला किंवा गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनीही कोरोना लस घेतली नाही तर त्यांना आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी कोव्हॅक्सिन लस घेण्याचा सल्लाही तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोरोना लस घेतलेली नसेल आणि कोरोनाची लागण झाल्यास गर्भवती महिलांना अनेक प्रकारच्या गंभीर परिणांनामा सामोरं जावं लागू शकतं, असं शनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन अर्थात NTAGI चे चेअरमन डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटलं आहे.

प्रेगन्सी दरम्यान कोरोना संक्रमण झालं तर गर्भवती महिलांना आयसीयूमध्ये भरती करण्याचीही वेळ येऊ शकते. तसंच वेळेपूर्वी प्रेगन्सी होण्याचीही शक्यता वाढते. त्याचबरोबर जन्मावेळी बाळाचं वजन कमी असण्याचीही शक्यता तयार होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

गर्भधारणा आणि कोरोनाचा नेमका डेटा नसल्यामुळे गर्भवती महिलांना कोरोना लस घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती हे सांगणं कठीण आहे. मात्र आदर्शपणे पहिल्या तिमाहीत लसीचा कोणताही डोस टाळला पाहिजे.

देशात दरवर्षी साधारण 2 कोटी 70 लाख महिला बाळांना जन्म देतात. तर 75 लाख महिला गर्भधारणेसाठी प्लानिंग करत असतात. या हिशेबाप्रमाणे गर्भवती महिलांपैकी केवळ 20 टक्के महिलांनी कोरोना लस घेणं चिंताजनक आहे.

मध्य प्रदेशातील हा आकडा देशात सर्वाधिक आहे. तिथे आतापर्यंत 33 टक्के महिलांनी कोरोना लस घेतली आहे. अन्य देशात गर्भवती महिलांवरील कोरोना लसीची ट्रायल पाहिल्यानंतर भारत सरकारनं जुलै 2021 पासून देशातील गर्भवती महिलांनाही कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे.

ज्या गर्भवती महिला पहिल्या तिमाहीत आहेत त्यांचा गर्भ विकासाच्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी लस घेण्यासाठी वाट पाहावी, असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वात मोठा झटका 

“नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राहुल गांधी गप्प का?” 

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”