बारामती | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पवारांच्या होमग्राऊंडवर म्हणजेच बारामतीत आज महाजनादेश यात्रा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांवर जोरदार टीका केली.
बुरे काम का बुरा नतिजा… सून, भाई, चाचा, भतीजा या नितीमुळेच ही गळती लागल्याची जहरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. बारामतीत महाजनादेश यात्रेचं भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी बोलताना फडणवीसांनी पवार कुटुंबावर जोरदार तोफ डागली.
आपली यात्रा बारामतीत येण्यासाठी निघताना या सभेच्या साऊंड सिस्टमवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यावरूनच त्यांनी आपला किती धसका घेतला हे समजतंय. पण त्यांच्या या कृत्याने आमचा आवाज दाबला जाणार नाही, असं म्हणत त्यांनी पवारांना ललकारलं.
उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत रहायला कुणी तयार नाहीये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
बारामतीत आता परिवर्तनाची हवा सुरु झाली आहे. आज होत असलेल्या सभेला झालेल्या गर्दीवरूनच लोकांची मानसिकता लक्षात येत आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“राजे दिवसा आणि रात्री कुठल्या अवस्थेत असतात… हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे” https://t.co/DJpBcfAS1G @nawabmalikncp @Chh_Udayanraje @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019
रामदास आठवलेंचा मौके पे चौका; उदयनराजेंचा भाजप प्रवेश होताच दिला पुष्पगुच्छ! https://t.co/lKYzhpNQGx @RamdasAthawale @Chh_Udayanraje
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019
“पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण निर्माण केलं जातंय”https://t.co/fm0Z9g0BQ7 @PawarSpeaks #Pakistan
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019