मुंबई | उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपत प्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
उदयनराजे दिवसा आणि रात्री कुठल्या अवस्थेत असतात हे अख्या महाराष्ट्राला माहितीये, अशी जळजळीत टीका मलिक यांनी उदयनराजेंवर केली आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडल्यावर पक्षातील नेत्यांनी त्यांना जोरदार लक्ष्य केलंय.
उदयनराजेंमुळे पक्षात नेहमी अडचण व्हायची. पवार साहेबांनी त्यांना वारंवार संधी दिली. पण अडचणीच्या काळात त्यांनी साहेबांची साथ सोडली, असं मलिक म्हणाले.
उदयनराजे भोसलेंनी जरी राष्ट्रवादी सोडली असली तरी सातारच्या पोटनिवडणुकीत आम्ही ती जागा नक्की जिंकू, असा दावा देखील मलिक यांनी केली.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या टीकेनंतर उदयनराजेंच्या प्रत्युत्तराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
महत्वाच्या बातम्या-
रामदास आठवलेंचा मौके पे चौका; उदयनराजेंचा भाजप प्रवेश होताच दिला पुष्पगुच्छ! https://t.co/lKYzhpNQGx @RamdasAthawale @Chh_Udayanraje
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019
“पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण निर्माण केलं जातंय”https://t.co/fm0Z9g0BQ7 @PawarSpeaks #Pakistan
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019
उदयनराजेंचे विरोधक आणि शिवसेना नेते नरेंद्र पाटील शरद पवारांच्या भेटीला! https://t.co/UrXXJp5DTr @NCPspeaks @NarendraMathadi @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 14, 2019