वंचितची नियत साफ नाही… ; वंचितचा भाजपला फायदा होतोय- शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. वंचित ज्या पद्धतीने जात आहे, त्यांची नियत साफ नाही असं चित्र आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

वंचितकडून सेक्युलर असल्याचं सांगितलं जातं मात्र त्यांचा फायदा भाजपला होत आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत. ते अल्पसंख्याक मेळाव्यात बोलत होते. 

वंचितने पहिल्याच लोकसभा निवडणुकीत मोठं मताधिक्य घेत आघाडीला धक्का दिला. वंचितच्या मतविभागनीमुळे आघाडीला मोठा फटका बसला आणि त्याचाच परिपाक म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास 10 उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

पाकिस्तान आणि भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण निर्माण केलं जातंय, असं म्हणत त्यांनी सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

दरम्यान, शरद पवार यांच्या या टीकेला प्रकाश आंबेडकर काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-