IPL 2022: DK पुन्हा टीम इंडियात कमबॅक करणार?; विराट कोहली म्हणाला…

मुंबई | बांग्लादेशविरूद्ध 2018 साली झालेल्या निदहास ट्राफीची फायनस सर्वांना आठवत असेल. फायनलमध्ये भारताला जिंकण्यासाठी एका सिक्सची गरज होती. त्यावेळी डीके म्हणजेच दिनेश कार्तिकने अखेरच्या बाॅलवर षटकार खेचत भारताला निदहास ट्राफी जिंकून दिली होती.

अशातच डीके पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) दिनेशने आरसीबीकडून खेळताना गोंलदाजांचा घाम काढला आहे. एकापेक्षा एक अशा स्फोटक खेळी डीकेने केली आहे.

डीकेच्या या घातक फलंदाजीमुळे आरसीबीला 6 पैकी 4 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आता दिनेश कार्तिकला पुन्हा टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अनेक क्रिकेटर्स आणि क्रिडा तज्ज्ञांनी याबद्दल मोठी वक्तव्ये केली आहे.

अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने दिनेश कार्तिकचं तोंडभरून कौतूक केलं आहे. तू भलत्याच फॉर्ममध्ये आहेस, हे आम्ही पाहतोय. तुला पुन्हा बॅटिंग करताना पाहणे हा मी माझा सन्मान समजतो, असं विराट कोहली म्हणाला आहे.

एबी डिव्हिलियर्सला देखील तुझ्या या मॅच फिनिशिंग खेळींचा गर्व वाटत असेल, असंही विराट म्हणाला. मी नक्की सांगू शकतो की दिनेश कार्तिकने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे, असंही कोहली म्हणाला आहे.

कार्तिकची खेळी आता आरसीबीसाठी टी 20 क्रिकेट खेळण्यापर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. अनेक वरच्या स्तरावरील लोकं तुझ्या खेळीची दखल घेतील, असं म्हण विराटने डीकेच्या टीम इंडियातील कमबॅकचे संकेत दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण: आमदार गणेश नाईक यांना अटक होण्याची शक्यता!

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांनो… उद्यापासून मार्केटमध्ये ‘हा’ मोठा बदल होणार!

“दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव”, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

“मला पुण्यातून बाहेर पडायचंय, पुण्यावर भयंकर संकट कोसळलंय”, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

पुढील 5 दिवस महत्त्वाचे! ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता