“कायदा सुव्यवस्था राखणं केवळ आमचं काम नाही”

मुंबई : शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात लोकशाही राहिली की नाही? हा प्रश्न आहे. आचारसंहिता लागल्यानंतर लगेच कारवाई कशी? ईडी कारवाई करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ईडी आणि पोलिसांची आहे असं त्यांनी सांगितले आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. नाव नसताना शरद पवारांवर गुन्हा कसा नोंद झाला? भाजपच्या डोक्यात सत्तेची मस्ती आलेली आहे. आमच्यावर कारवाई का केली याबाबत विचारणा करण्याचा आम्हाला अधिकार आहे. कार्यकर्त्यांची धरपकड करुन दबावतंत्राचा वापर केला जात आहे, असही मुंडे यांनी म्हटलंं आहे. 

देशातील लोकशाही संकटात आहे. शरद पवारांकडूनही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. असं असताना पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पकडण्यात येत आहे, असाही आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी शिस्तबद्ध पक्ष आहे, कोणताही गोंधळ न करता निषेध नोंदवावा, महाराष्ट्रभर लोकांमध्ये संतापाची भावना आहे. लाखो कार्यकर्ते मुंबईत येण्याचा प्रयत्न करतायेत. कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावं, कुठेही गोंधळ करु नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे

दरम्यान, शरद पवारांना विनाकारण आरोप करुन नाव बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. पवारांना जो प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण सुरु आहे, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-