बीड | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गळतीच्या पायवाटेचा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. कोण बाकी राहिलं आता राष्ट्रवादीत??? अशी बोचरी टीका मंत्री पवारांचे एकेकाळचे सहकारी आणि आताचे शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आता शोधयात्रा म्हटलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. बीडमधल्या शिवसेना महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर बोलत होते.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आता शोध घेण्याची यात्रा आहे, अशी टीकाही जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. मी शिवसेनेत प्रवेश करुन पायवाट तयार केली. आता पायवाटेचा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मला मंत्रिपद कशासाठी तर जनतेच्या हितासाठी आहे. गोरगरीब जनता हेच शिवसेनेचे कायम केंद्रबिंदू राहिले आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून अजूनही या राज्यांमध्ये नवे वाहतूक नियम लागू नाहीत! https://t.co/tyq7O0G1VD #NewtrafficRule
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
माजी खासदार… माजी खासदार काय लावलंय; मी अजूनही शिवसेनेचा नेता आहे; खैरे भडकले https://t.co/CzVMfBHVVw @ChandrakantKMP
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
“युती करायची का नाही… अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील”- https://t.co/Lurh6wyxt9 @DRaote @shivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019