शरद पवारांच्या पायाच्या धुळीची तरी लायकी आहे का त्या पडळकरची- जितेंद्र आव्हाड

मुंबई |  भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यात ठिकठिकाणी निषेध सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली आहे.

शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्याची, अशा शब्दात आव्हाडांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे.

जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवतोय, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसंच पडळकर यांनी आपली वक्तव्य सांभाळून करावीत. अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पडळकरांवर कारवाईचा इशारा दिला आहे. तर पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

 

-“फडणवीसांना आणि त्यांच्या पत्नीला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बरं चवताळले आहेत?”

-सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता… धनंजय मुंडेंची पडळकरांवर टीका