“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार?”

मुंबई | आम्ही दोनशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना घालवलं, तुम्ही कोण आहात? लोकशाहीत कधीही विकल्प हिनता नसते, विकल्प असतोच. काँग्रेस हा समानता मानणारा पक्ष आहे. काँग्रेस हा समतेवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो, असं काँग्रेस नेता कन्हैया कुमारने सांगितलंय.

सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीनं कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी आमदार मोहन जोशी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आदी नेते उपस्थित होते.

मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे, अशा शब्दात कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) याने नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

सध्या व्हॉट्सअपवर देशाबद्दल काहीही बोललं जात आहे. यांना वाटतं कुणावरही यूएपीए लावू, बोलती बंद करु, पण साहेब हा भारत आहे, असंही कन्हैया कुमारने ठणकावून सांगितलं.

देशाच्या नावावर मित्रांचं भलं करण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत कधीच डिझेल 100 रुपये लिटर झालं नाही. महागाई आकाशाला पोहोचली आहे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीकास्त्र सोडलंय.

गांधींजींची हत्या करणारे लोक आज देश विकायला निघाले आहेत. पंतप्रधान म्हणजे देश आहे का? पंतप्रधानांबद्दल काही बोललं की देशद्रोही ठरवलं जातं. जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार? असा खोचक सवालही कन्हैया कुमारने विचारलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘बाबरीच्या निकालानंतर वाईनची बॉटल घेतली आणि…’; रंजन गोगोई यांचा खुलासा 

‘मौका सभी को मिलता है…’; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा 

‘….हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे’; जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन 

“CDS बिपीन रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली”

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर