महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली धक्कादायक माहिती

मुंबई | राज्यात शाळा सुरू झाल्या असतानाच गेल्या 20 दिवसांत 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढून या वयोगटातील 1 हजार 711 मुलांना करोनाची लागण झाल्याचं आढळलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुलांमध्ये लक्षणे सौम्य असली तरी ही मुले स्प्रेडरचं काम करू शकतात. त्यामुळेच खबरदारी घेण्याची गरज असून मुलांचे तातडीने लसीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. त्याचा विचार करून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

राज्यात कोविड स्थिती सध्या नियंत्रणात आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सहाशेपर्यंत खाली आली आहे.

रूग्णसंख्या नियंत्रणात असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्याचअनुषंगाने आरोग्यमंत्री टोपे यांनी लसीकरणाबाबत मोठे पाऊल उचलण्याचे स्पष्ट संकेत आज दिले.

लहान मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण यावर टोपे यांनी अधिक भर दिला. तसेच मुलांचं लसीकरण तातडीने केले पाहिजे, असं टास्क फोर्सचेही मत असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं.

कोविडचा धोका पाहता लहान मुलांचे तातडीने लसीकरण करण्याची गरज असून आणि दोन्ही डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे, असं टोपे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणार असाल तर जाणून घ्या हे नवे नियम!

सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता

“राज्यात सत्ताबदल होणार, नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार”

शरद पवारांसारखं चंद्रकांत पाटलांनीही केलं भरपावसात भाषण, पाहा व्हिडीओ

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घट; वाचा कारण