“आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता”

मुंबई | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहेत. राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि भाजपनं जोरदार ताकद या निवडणुकीसाठी लावली होती.

अशातच आता राज्यातील सर्वच निवडणुकांचे निकाल जवळजवळ स्पष्ट होताना दिसत आहेत. कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं.

अशातच कवठे महांकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे.

सर्वच विरोधीपक्ष आणि खुद्द राष्ट्रवादीतील एक गट रोहित पाटलांच्या विरोधात गेल्यानं रोहित पाटील यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, रोहित पाटलांनी निकालात विरोधकांना बाप दाखवल्याचं दिसत आहे.

रोहित पाटील यांची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. लहान वयात रोहित पाटलांनी मोठं यश मिळावल्यामुळे आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रोहित पाटील यांचं कौतुक केलं आहे.

रोहित तुझं खूप खूप अभिनंदन. कोणतं पद असो की नसो पण आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवलाय. त्याचं फळ तुला आज मिळालं, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

आजचं हे यश तुझं आहे. आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता, असं म्हणत चित्रा वाघ यांनी रोहित पाटील यांना कौतुकाची थाप दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नाथाभाऊंना धक्का! एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकला

 “येत्या काळात आम्ही त्यांना पुरून उरू, भाजपच ‘नंबर 1’चा पक्ष”

‘आज आबांची खूप आठवण येतेय’; रोहित पाटील भावूक

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…