“ज्याची बायको पळून गेली, त्याचं नाव मोदी ठेवलं”

मुंबई | ‘मोदीला मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’, या नानांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी मोदींबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झालेत.

नाना पटोले यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांनी खोटा गावगुंड आणल्याचा आरोप केला आहे, असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, ‘गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे. भाजपची काय अवस्था झाली आहे, लोकं हे पाहून हसत आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे. असं असताना अजून काय राहिलं आहे. हे प्रश्न विचारण्यापेक्षा मी भाजपला बेरोजगारी, महागाई, गरिबांचे प्रश्न आहे. त्याबद्दल ती बोलत नाही.’

भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केलं. त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा तीव्र निषेध आंदोलनं करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदींबाबत नाना पटोले यांना बोलताना लाज वाटत नाही. जगात क्रमांक एकचे पंतप्रधान त्यांच्याबाबत हे बोलत आहेत. त्यांनी देशातील 60 कोटी महिलांचा अपमान केलाय. हा वेडा झालेला माणूस आहे, त्याला नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे, असं बावनकुळे म्हणालेत.

संपूर्ण काँग्रेस पार्टी संपवल्याशिवाय ते राहणार नाही. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करु. नाना पटोले यांना आम्ही सोडणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“…मग बघू कोण सरस ठरत ते”; उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना आव्हान 

 “मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे आणि तलवार जरी हातात नसली तरी…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

 निधनाच्या अफवांवर लता मंगेशकर यांनीच केलं ट्विट, म्हणाल्या…

  येत्या 2 दिवसात ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

  “…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती