नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणतात…

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे जे काही सरकारमध्ये सुरु आहे. त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली असून 10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय, असं मोठं व्यक्तव्य केलं आहे.

भंडाऱ्यात काँग्रेसद्वारे आयोजित कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. नाना पटोलेंनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नाना पटोलेंच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय जाणकारांचा भुवया उंचावल्या असून 10 मार्च नंतर नाना पटोले मोठ्या राजकीय भूकंप करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. 5 राज्याच्या निवडणुका असून माझे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं आहे, असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं आहे.

दहा मार्च नंतर महाविकास आघाडी सरकार जाणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

महाविकास आघाडीतील मंत्री एकामागोमाग एक घोटाळ्यात अडकत असल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं. मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मांजरी भागातील एका सभेत बोलताना दहा मार्चनंतर महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं म्हटलं होतं.

सभेनंतर त्या वक्तव्याबद्दल विचारलं असता कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण दहा मार्चची तारीख दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र काल पुन्हा एकदा त्यांनी दहा मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार जाईल नमस्कार असं वक्तव्य केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

भाजपला मोठा धक्का बसणार???, राष्ट्रवादी मोठी खेळी करण्याच्या तयारीत 

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा