…आता खासदार झालो तेही माझ्या मर्जीने नाही- नारायण राणे

मुंबई : आमदार झालो तेव्हा मंत्री व्हायचं होतं. मंत्री झालो तेव्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं. आता खासदार झालो पण माझ्या मर्जीने झालो नाही. माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातोय. पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलावं लागत आहे, अशी खंत खासदार नारायण राणेंनी व्यक्त केली आहे. नारायण राणे यांच्या ‘नो होल्डस् बार्ड’ या इंग्रजीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये करण्यात आलं.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे हे उपस्थित होते. यावेळी नारायण राणे बोलत होते.

मी पुस्तक लिहिताना सावधगिरी बाळगली आहे. काही गोष्टी टाळल्या आहेत. शिवसेनेत आता काही नाही आता सगळं संपलं आहे, असं नारायण राणे म्हणाले.

मी साहेबांना 6 पानी पत्र लिहलं आणि पक्ष सोडतो आहे. दुसऱ्या दिवशी मला साहेबांचा फोन केला. नारायण रागवला का, एकदा ये. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले राणे परत आले तर मी घर सोडीन. साहेब हे साहेब होते. प्रेम फक्त साहेबांवर केलं, असंही नारायण राणे म्हणाले. 

आज नारायण राणेंचं जे कौतुक केलं ते माझं नाही तर बाळासाहेबांचा आहे. बाळासाहेब माझं भाषण ऐकून सांगायचे तो किती फास्ट बोलतो. हळू बोलं. साहेबांनी आम्हाला घडवलं आहे. तो काळ पुस्तकात गाळला आहे, असंही राणेंनी सांगितलं आहे. 

दरम्यान, आम्ही पक्ष वाढवायला आणि पक्ष वाचवायला काम केलं. पण आता शिवसैनिक ते करू शकणार नाहीत. आता शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत. आम्हाला तर त्यावेळी वडापावही मिळायचा नाही, असं नारायण राणेंनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर शिवसेना समाधानी!

-रवी शास्त्रींची पुन्हा एकदा भारताच्या प्रशिक्षकपदी निवड!

-“महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट तरीही मुंबई दर पावसाळ्यात तुंबते”

-सैफने केलं स्मिता तांबेच्या अभिनयाचं कौतुक; म्हणाला…

-भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी ही नावं चर्चेत; कोणाची लागणार वर्णी???