मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत. साऱ्या देशात नरेंद्र मोदींची हवा त्यामुळे राहुल गांधी अत्यंत परेशान आहेत, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
भारत-चीन तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला आठवलेंनी उत्तर दिलंय.
सर्व पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या मागे उभं राहायला हवे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो. निवडणूक आल्यावर सरकारने अथवा मोदींनी आपले जवान शहीद केले असं म्हणणं चुकीचं आहे. आपला भारत आता 1962 चा भारत राहिला नाही हे चीनने लक्षात घ्यावं, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कुरकुर नाही तर कुरबूर आहे विखे पाटलांना मी ओळखतो त्यांच्याबद्दल भाजपमध्ये अस्वस्थ आहेत असं बोलणं चुकीचं आहे, असंही रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भिवंडीनंतर ‘या’ शहरात 30 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर
-जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!
-सुशांत सिंग राजपूतच्या न्यायासाठी करणी सेना लढणार
-उद्याच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचा मोठा निर्णय