जरा थांबा… कमलनाथ अजूनही चमत्कार करु शकतात; शरद पवारांना विश्वास

मुंबई  |  मध्य प्रदेशात जे झालं तसं काही महाराष्ट्रात होणार नाही. काळजी करू नका. महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी ते आज विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मध्य प्रदेशमधल्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं.

मध्य प्रदेशमधलं सरकार अजून गेलेलं नाहीये. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास आहे. ते चमत्कार करू शकतात अस लोकांना वाटतं. आपण बघूया दोन दिवस काय होतं, असंही ते म्हणाले.

दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना संधी मिळ नाही, असा आरोप त्यांनी केला. यावर काँग्रेसमध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि भविष्य देखील आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

-कोरोना पासून वाचण्यासाठी पंकजाताईंनी दिला हा सल्ला…

-मोदींच्या हातात भारताचं भविष्य सुरक्षित; भाजपात येताच महाराजांना साक्षात्कार

-ज्योतिरादित्य शिंदेंच्या हाती कमळ; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

-आता शरद पवारांचाही बाप काढणार का?; गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

-“…म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री सोडून वर्षा बंगल्यावर जाणार नाहीत”