रणबीर-आलियाचं लग्न तर झालं पण शेजाऱ्यांनी घोळ घातला, प्रकरण पोलिसात गेलं अन्…

मुंबई | रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या विवाहामुळे मुंबईमधील पालीहील येथे राहणाऱ्या लोकांसाठी काही दिवस त्रासदायक गेले आहेत.

रणबीर कपूरच्या घरी मोठ्या प्रमाणात रिपोर्ट्स जमा होतात. जेव्हा कोणी सेलिब्रिटी रणबीरच्या घराकडे येतात तेव्हा मीडियावाले त्यांना घेराव घालतात.

यासंदर्भात पाली हिल रेजिडेंट्स असोसियशनकडे तक्रार करण्यात आली आहे.  असोसियशन आपल्या वतीने या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करण्यास सांगितलं आहे.

येथे राहणाऱ्या रहिवाशांनी म्हटलं आहे की, रणबीर आणि आलियाच्या लग्नामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. तसेच काही फोटोग्राफर स्वत:ला जखमी केल्याचं येथील लोक सांगतात. कारण की, पालीहिल हा उताराचा भाग आहे आणि याठिकाणी अनेक धोकादायक वळणे आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नावेळी तब्बल 200 माध्यमकर्मी असल्याचं सांगण्यात येत आहे. परिसरातील रस्त्यांवर कॅमेरे लावण्यात आले होते.

ज्यावेळेस एखादी कार विवाहस्थळावर पोहचत असे तेव्हा प्रतिक्रिया घेण्यासाठी एकचं गर्दी होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात असोसियशने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्रकारांना रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या विवाहस्थळी येणाऱ्या गाड्या अडवू नका, असा इशारा दिला होता.

दरम्यान, फोटोग्राफरांना सुचित करण्यात आले होते की, जे सेलिब्रिटी फोटो काढण्यास उत्सुक असतील त्यांची वाट पहा. एकंदरीतच रणबीर आलियाच्या विवाहामुळे शेजाऱ्यांना त्रासाला सामाेरं जावे लागलं.

महत्त्वाच्या बातम्या- 
राज ठाकरेंच्या भाषणानंतर शरद पवारांना सतावते ‘ही’ चिंता, म्हणाले…

गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं, म्हणाले “शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”

“एकेकाळी माझे पाय धरायचे, ते आता माझ्याविरोधात आणि पवारांवर बोलतात

‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ