मुंबई | भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील एका रुग्णालयातील एका रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रुग्णानं हॉस्पिटलमधील स्थिती सांगितली आहे. हा व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात माणसांच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील परिस्थिती गंभीर असताना आमदार नितेश राणे यांनी एका रुग्णाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला हा रुग्ण नीट लक्ष दिलं जात नसल्याचं व्हिडीओमध्ये सांगत आहे.
शताब्दी हॉस्पिटल. महाराष्ट्रात जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही. 50 दिवस सरकारचं ऐकून घेतल्यानंतरही प्रत्येक दिवशी हे बघायला मिळत आहे. मग आपल्याला या सरकारची गरज काय?, असं म्हणत नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मुंबईतील स्थितीवर केंद्राचं विशेष लक्ष असून, केंद्रानं पथक नियुक्त केलं आहे.
Shatapbdi hospital!
No value of life left in Maharashtra anymore!
After almost 50 days of Listening to the Maha Gov if this is what we have to see everyday then why do we need this Gov anyways!!! pic.twitter.com/JZJ5YUdFIh— nitesh rane (@NiteshNRane) May 10, 2020
महत्वाच्या बातम्या-
-लॉकडाउननंतर एकनाथ खडसे भाजपला धक्का देणार; घेणार मोठा निर्णय?
-मातृदिनी आमदार रोहित पवारांनी आईसाठी स्वत:च्या हातानं बनवला चहा
-…तर मी निवडणूक लढवणार नाही; उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना मेसेज